ग्रामविकासाच्या अनेकजण गप्पा मारतात, सरकारी पातळीवर तर रामराज्यापासून स्मार्ट व्हिलेजपर्यत अनेक घोषणा झाल्या पण देशातील व महाराष्ट्रातील खेडी सुधारणांपासून, विकासापासून कोसो मैल दूर राहिली, स्थलांतर होत राहिली. शहरात गर्दी वाढली. ना ग्रामविकास ना शैक्षणिक सुधारणा, ना शेतीला पाणी, ना हाताला काम. पूर्वजन्मीचं पाप म्हणून कायमस्वरूपी दुष्काळी भागात जन्माला यायचं आणि दुष्काळी पट्ट्यातच विकासापासून वंचित आयुष्य कसं बसं ओढायचं असं निराश, हताश जीवन जगणाऱ्या जनतेला एक आशेचा दीप गवसलाय येरळा प्रोजेक्ट सोसायटी आणि जालिहाल पॅटर्न.